सध्या बाजारात चांगली रानातील कंटोळी येत आहेत. भाजी नेहमी करतो पण आता जरा तीच कंटोळी भरून अधीक रुचकर बनवूया.
साहित्यः
कंटोळी तीन-चार जुड्या किंवा पाव किलो
दोन मध्यम कांदे चिरून
अर्धा वाटी सुके खोबरे किसून
१ चमचा जीरं
२ चमचे धणे
२ चमचे तीळ
१ छोटा चमचा राई
१ चमचा हळद
१ चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला किंवा आवडत असेल तर गोडा मसाला
थोडी चिंच
चिंचेच्या प्रमाणात गुळ म्हणजे चव आंबट गोड मिक्स होईल अशी.
दोन-तीन चमचे ओलं खोबरं
तेल
मिठ
1)
2)
3)
कृती
कंटोळी धुवून, देठ काढून त्याला मध्ये एका बाजूने चीर द्या व आतील बी सुरीच्या सहाय्याने काढून टाका.
4)
तव्यावर किंवा पॅनमध्ये कांदा, धणे, तीळ व सुके खोबरे खमंग भाजून घ्या व त्याचे मिक्सरमध्ये वाटण करा. वरील साहित्यातील तेल व मोहरी सोडून, चिंचेचा कोळ करून सगळे साहित्य एकत्र करा.
5)
आता हे मिश्रण कंटोळीमध्ये चांगल दाबून भरा.
6)
पॅनमध्ये तेल गरम करून राईची फोडणी द्या व त्यावर ही कंटोळी सोडा जर मिश्रण उरल असेल तर तेही तव्यात सोडा व शिजण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेउन शिजूद्या.
7)
गॅस कमी फ्लेमवर ठेवा मध्ये मध्ये परतवा व २०-२५ मिनीटे शिजवून गॅस बंद करा.
८) ही भरली कंटोळी चपाती किंवा भाकरी सोबत छान लागतात.